Sad Status in Marathi
|

Sad Status in Marathi | 1200+ बेस्ट सैड स्टेटस मराठी मध्ये

जर आपणास कोणी प्रेमात धोका दिला असेल व तुम्ही दु: खी असाल तर आपल्या दु: खी मनाच्या भावना Sad Status Marathi च्या सहाय्याने व्यक्त करा. 1200+ पेक्षा अधिक सैड स्टेटस मराठी चा संग्रह फक्त आपल्यासाठी.

Sad Status in Marathi

ती मला नेहमी म्हणायची कि,
मी तुला माझं करूनच सोडेन,
आज तिने तेच केलं,
तिने मला तीच करूनच सोडलं.

तू दिलेल्या दुःखाने,
मला बरेच काही शिकवले,
जग हे कसे असते,
शेवटी तूच मला दाखवले..

आठवणी विसरता येतात,
पण प्रेम विसरता येत नाही.

जवळीक साधून माझ्याशी,
कशी किमया केलीस.
वेड लावून माझ्या मनाला,
तू का निघून गेलीस.

रस्ता बघून चल..
नाहीतर एक दिवस असा येईल,
की वाटेतले मुके दगडही,
प्रश्न विचारू लागतील.

कोसळणारा पाऊस पाहून,
मला नेहमीच एक प्रश्न पडतो,
माझे तर ठीक आहे,
पण हा कोणासाठी रडतो.

ती जाता जाता मोठ्या गर्वाने म्हणाली,
तुझ्यासारखे खूप भेटतील मला,
मी पण हसून तिला विचारलं,
आता माझ्या सारखाच का पाहिजे तुला.

हरवलेली पाखरे येतील का पुन्हा भेटायला,
गेलेले दिवस येतील का पुन्हा सजवायला.

वावटळ आठवणींचे आज मी पाहिले,
स्वप्नातील घर तुझे माझे,
आज पुन्हा एकदा त्यात वाहिले.

सगळ्यांनसाठी मी आहे.
पण माझ्यासाठी कोणीच नाही ?

होईलच तुला एक दिवस सये
माझ्या भोळ्या प्रेमाची जानीव,
भ्रमर कुणी जाता हात सोडून
भासेल तुला फक्त माझीच ऊनीव..

जगाची रीतच न्यारी आहे,
इथे सगळ्यांना आपली प्रितच प्यारी आहे,
मी म्हणत नाही शेवटपर्यंत साथ दे,
पण शक्य आहे तोपर्यंत,
तरी माझा हातात हात घे.

माझ्यासारखीच ती पण अस्वस्थ असेल,
रात्रभर नाही,
पण क्षणभर तरी माझ्यासाठी झोपत नसेल.

प्रेम तुझं खरं असेल तर
जीव तुझ्यावर ओवाळेल ती
स्वत:च्याचं भावनांचं मन
शेवटी ती मारेल तरी कीती..

बेस्ट सैड स्टेटस मराठी मध्ये

जवळची नाती ही माणसाला,
कधी कधी खूप छळतात,
जितके जास्त जपाल तितके,
आपणाला आणखी दुर लोटतात.

जीवापाड प्रेम केल्यावर कळत की,
प्रेम म्हणजे काय असतं,
तुम्ही प्रेम कोणावरही करा,
पण ज्याच्यावर कराल त्याच्यावर
अगदी शेवटपर्यंत करा.

जीवनात जर तुम्हाला कोणी आवडल
तर त्याला फक्त आठवणीत ठेवा,
प्रेम करू नका कारण प्रेम संपत
पण आठवणी कधीच संपत नाही..

मला याच अजिबात वाईट वाटत नाही
की तू माझी नाही झालीस,
सुख तर या गोष्टीच आहे कि
कधीतरी तू माझी होतीस.

तुला जायचे होते तु गेलीस,
मला गमवायचे होते मी गमावले,
फरक फक्त एवढाच आहे की,
तु आयुष्यातला एक क्षण गमावला,
आणि मी एका क्षणात पूर्ण आयुष्य गमावले.

कोणाची आठवण येणं कठीण नाही
कठीण आहे ते म्हणजे मरेपर्यंत साथ देणे
असे मोजकेच असतात तेच आयुष्यभर साथ देतात.

आज तुला मी नकोय हे मला कधीच कळल होत,
तू सोडून जाणार आहेस मी कधीच जानल होत.

नाती हि झाडाच्या पानासारखी असतात,
एकदा तुटली कि त्यांची हिरवळ
कायमची निघून जाते.

नशिबात आणि हृदयात फक्त एवढाच फरक असतो,
जो हृदयात असतो तो नशिबात नसतो
आणि जो नशिबात असतो तो हृदयात नसतो.

मी तुला मिळवत असतांना,
तु मला कुठेतरी गमावत होतीस,
मी तुझ्या नजरेत भरतांना मात्र,
तु माझ्या नजरेतून उतरत होतीस.

कुठेही रहा पण सुखात रहा,
सुख माझे त्यात आहे,
स्वतःचा जीव जपत रहा,
कारण जीव माझा तुझ्यात आहे.

कितीही जगले कोणी कोणासाठी
कोणी कोणासाठीच मरत नाही
अनुभव येत असतात प्रत्येक क्षणाला
पण नशिबाचे चक्र थांबत नाही,
आयुष्यात कितीही कराल प्रेम कोणावर
त्याचे मोल सहज कोणाला कळत नाही.

प्रेमात एकदा खाल्ला धोका,
आता प्रेमात पडायची इच्छाच नाही,
dआता जीवनात फक्त हसत आणि हसवत राहायचंय,
आता परत रडायची इच्छाच नाही.

Sad Quotes in Marathi

प्रेमाची खरी किंमत
ते दूर गेल्यावर कळते,
कितीही दुर्लक्ष केले तरी,
नजर मात्र तिथेच वळते.

कधी आयुष्यात आलीस
अन कधी माझी सवय झाली
काही कळलेच नाही,
एक एक दिवस जात होता
अन एक एक आठवण
मनाच्या पटलावर तरंगून जात होती.

जगात खूप गोष्टी आहेत खेळण्यासाठी..
पण तुला माझ्या भावनाच आवडल्या का,
खेळण्यासाठी.

जीवनात जोडलेली नाती
कधी तोडायची नसतात.
छोट्याश्या वादळानं
विश्वासाची घर मोडायची नसतात.

जेव्हा काही खास लोक
आपल्याला दुर्लक्षित करत असतील,
तेव्हा समजून जा की,
त्यांच्या सगळ्या गरजा पूर्ण झाल्या आहेत.

आता मी तुझ्या जीवनातला महत्वाचा व्यक्ती नाही
पण मी आशा व्यक्त करतो कि,
एके दिवशी जेव्हा मी तुझ्या जीवनात नसेल
तेव्हा माझी आठवण आल्यावर तू हळूच
हसशील आणि म्हणशील
नक्कीच तो इतरांपेक्षा चांगला होता.

प्रेमाचं सारं कर्ज फेडलंय मी..
हिशोब उरलाय तो फक्त,
तू दिलेल्या जखमांचा.

कुणाला कितीही आपण
आपलं मानलं तरीही,
शेवटी ते परकेच ठरतात.

कुणास दुखावू नये उगाच गंमत म्हणून,
बरंच काही गमवावे लागते किंमत म्हणून.

जे जगतात ते प्रेम करतात
आणि जे जळतात ते लफडं
म्हणतात.

कधी कोणाच्या डोळ्यामध्ये
पाणी येऊ देऊ नये
हसवता नाही आलं तरी
अश्रूंचं कारण होऊ नये.

आज मला खूप रडावसं वाटतंय,
स्वतःशी परत खूप भांडावंसं वाटतंय,
भरलेल्या डोळ्याने आरश्या समोर बसावसं वाटतंय,
अन आपलं कोणीच नाही म्हणून,
स्वतःचेच डोळे पुसावंस वाटतंय.

माझ्यापासून दूरच जायचंय,
तर खुशाल जा.
फक्त एवढंच लक्षात ठेव,
पुन्हा मागे वळून बघायची
मला पण सवय नाही.

जाऊदे तिला मला सोडून
दुसऱ्याच्या मिठी मध्ये
तसेही एवढ प्रेम करूनसुद्धा
जी माझी नाही झाली,
दुसऱ्याची तरी कशी होणार?

परकचं करायच होत
तर जवळ का गं घेतलस ?
विश्वासच नव्हता तर
प्रेम का गं केलस ?

Breakup Status Marathi

आपली काळजी करणाऱ्या माणसाला गमावू नका
एखाद्या दिवशी जागे व्हाल, तेव्हा कळेल की
तारे मोजण्याच्या नादात आपण चंद्रच गमावून बसलो.

तुझ्यासाठी खूप सोपे असेल मला विसरणं,
पण माझ्यासाठी खूप कठीण आहे,
तुला विसरून जगणं !

जो या वेड्या मनाला बऱ्याचदा रडवतो,
तो वेडाच या मनाला खूप खूप आवडतो.

प्रेम त्याच्यावर करा,
ज्याचे ह्रदय आधीच तुटलेले आहे,
कारण ह्रदय तुटण्याचे दुःख,
त्याच्याइतके कुणालाच माहित नसते.

विसरून जा तिला जी तुला विसरेल,
बघू नकोस तिला जी तुला रडवेल,
पण चुकूनही दूर जाऊ नकोस
तिच्यापासून जी स्वतः रडून
जी तुला हसवेल.

नेहमीच आनंद मिळेल असे नाही,
कधी कधी दुःख पण सोसावे लागते,
कितीही अहंकारी असाल तरीही,
प्रेमात मात्र कधी ना कधी झुकावेच लागते.

जेव्हा आपली नखं वाढतात तेव्हा
आपण नखं कापतो बोटं नाही
त्याच प्रमाणे जेव्हा गैरसमजातून
नाती तुटायची वेळ येते तेव्हा
अहंकार तोडा नाती नाही.

रहा तु कुठेही,
पण जप मात्र स्वतःला.
आडोशाला उभे राहून,
पाहीन मी तुझ्या सुखाला.

जाता जाता ती सांगून गेली,
काळजी घेत जा स्वतःची,
पण तिचे डोळे सांगत होते की,
आता माझी काळजी कोण घेणार ?

येवढे तरी माझ्यावर उपकार करुन बघ,
माझ्या डोळ्यातील आसवांतल्या
वेदना ओळखून बघ.

आठवणीत नाही ठेवलस तरी चालेलं
पण..? विसरायचा प्रयत्न करु नको,
तुझ्यासाठी जग सोडायची तयारी आहे माझी
पण…? तु दुसऱ्यासाठी मला सोडु नको.

एके दिवशी माझा श्वास बंद होईल
नको विचार करूस कि माझे प्रेम कमी होईल
अंतर फक्त एवढंच असेल
आज मी तुझी आठवण काढत आहे.
उद्या माझी आठवण तुला येईल.

तिच्या डोळ्यात पाहिले तेव्हा समजले,
प्रेम कशाला म्हणतात,
आणि सोडून गेली तेव्हा समजले,
खरे प्रेम कशाला म्हणतात.

ब्रेकअप स्टेटस मराठी

तुझ्या येण्याच्या चाहुलीने
अजूनही तिथेच उभा राहतो,
जिथे ब्रेकअप करून तुझ्या जाण्याने
अजूनही तिथेच तुझी वाट पाहतो.

तिला वाटत मी तिला आता विसरलो ही असेल
पण तिला का नाही कळत
वेळ बदलते, काळ बदलतो
पण पाहिलं प्रेम कधीच नाही विसरू शकत.

नाही म्हणालीस जरी तू,
नाही दुखी होणार मी,
जगत होतो, जगत आहे,
जगतच राहणार मी.
आता निरोप घेतो दुःखी नको होऊस
तुजसमोर नाही पुन्हा येणार मी.

जेव्हा तुमची जवळची व्यक्ती
तुमच्यावर रागवायची बंद होते
तेव्हा समजून जा
तुमची त्यांच्या आयुष्यातली
महत्वाची जागा गमावलीत.

माहिती आहे तुझ्या नजरेत मला,
काहीच किंमत नाही.
पण माझी किंमत त्यांना विचार,
ज्यांना मी वळून सुद्धा पाहत नाही.

तुझ्या साठी बघ मी,
किती मोठ्ठं मन केलं.!
तुला आवडतं खेळायला म्हणून..
हृदयाचं खेळणं केलं..

प्रेम कोणावर करायचे?
जो आपल्याला आवडतो त्याच्यावर की
ज्याला आपण आवडतो त्याच्यावर
मन वेधून घेणाऱ्या गुलाबावर की
त्याला जपणाऱ्या काट्यावर.

जर तुम्हाला रिजेक्ट,
अस्वीकार केलं तर निराश होऊ नका.
सर्वसाधारण लोक महागड्या वस्तू रिजेक्ट करतात
त्या स्वीकारण्याची त्यांची ऐपत, लायकी नसते.

विसरायचे म्हटलं विसरताही येत नाही,
तुझ्यावीना एक क्षण राहताही येत नाही.

तुझ्या अशा फसवणुकीने,
मन घाबरते पुन्हा प्रेम करण्यास,
ओळखीच्या माणसाशी देखील,
आता तयार नसते बोलण्यास.

एखाद्याला सोडून जातांना,
मागे पहावसं वाटलं तर पुढे जाऊ नये,
जीवघेण्या माणसांच्या गर्दीत एकटं राहण्यापेक्षा,
जीव लावणाऱ्या माणसांच्या मनात भरून रहावं.

मागितली होती फक्त तुझी साथ,
तु तर सोडून गेलीस हातातला हात,
म्हणूनच आता तुझ्याकडे
माझे काहीच मागणे नाही,
पण तुझ्याशिवाय जगणे,
म्हणजे काहीच जगणे नाही.

तुला आताच सांगून ठेवते
प्रेम म्हणजे मंत्रालयातील फाईल नाही
कि जाळली आणि मिटवलं सगळं.

Breakup Quotes in Marathi

काही लोक इतके नशीबवान असतात की,
दुसऱ्यांना दुखावून ही,
नेहमीच त्यांना परत खुप प्रेम मिळते,
आणि काहीजण इतके कमनशीबी असतात की,
दुसऱ्यांना इतके भरभरुन प्रेम देऊनही,
मोबदल्यात त्यांना दुःख आणि धोकाच मिळतो.

शब्दातून दुःख व्यक्त करता आले असते,
तर अश्रुंची गरज भासली नसती
सर्व काही शब्दात सांगता आले असते
तर भावनांना किंमतच उरली नसती.

जीवनात प्रेम एकदाच करायचे असते,
मन कधी कोणाचे मोडायचे नसते,
ज्याने केला भरवसा,
त्याच्या भावनांशी कधी खेळायचे नसते.

कुणी तुला विसरेल तर काय करशील?
सगळ्या आठवणी मिटवेल तर काय करशील?
कुणाला सोडण्यापूर्वी एकदा विचार नक्की कर
कुणी तुला सोडले तर काय करशील?

ज्या हक्काने आपण आपला राग व्यक्त करतो,
तेवढ्याच हक्काने आपले प्रेम व्यक्त करा,
कारण नाते तोडणे सोपे आहे,
पण ते पुन्हा जोडणे खूप अवघड आहे.

कोण कोणाचे नसते
हे अगोदर समजले असते,
तर हे तुटणारे नाते,
मी कुणाशी जोडलेच नसते.

आयुष्यात वाईट तेव्हा वाटते,
जेव्हा आपण काही चुका करतो,
पण सर्वात जास्त वाईट तेव्हा वाटते जेव्हा,
त्या हजार चुका आपण
एका चुकीच्या व्यक्तीसाठी करतो.

कितीही जगले कोणासाठी,
कोणीच कोणासाठी मरत नाही,
अनुभव येत असतात प्रत्येक क्षणाला,
पण नशीबाचे चक्र थांबत नाही,
आयुष्यात कितीही कराल प्रेम कोणावर,
त्याचे मोल सहज कोणाला कळत नाही.

आज किनाऱ्यावर प्रत्येक लाट
चिंब चिंब भिजली होती,
तेव्हा आठवले कुशीत माझ्या
येऊन तू निजली होती.

कोण कोणाचे नसते
हे अगोदर समजले असते,
तर हे तुटणारे नाते,
मी कुणाशी जोडलेच नसते.

आयुष्यात वाईट तेव्हा वाटते,
जेव्हा आपण काही चुका करतो,
पण सर्वात जास्त वाईट तेव्हा वाटते जेव्हा,
त्या हजार चुका आपण
एका चुकीच्या व्यक्तीसाठी करतो.

कितीही जगले कोणासाठी,
कोणीच कोणासाठी मरत नाही,
अनुभव येत असतात प्रत्येक क्षणाला,
पण नशीबाचे चक्र थांबत नाही,
आयुष्यात कितीही कराल प्रेम कोणावर,
त्याचे मोल सहज कोणाला कळत नाही.

आज किनाऱ्यावर प्रत्येक लाट
चिंब चिंब भिजली होती,
तेव्हा आठवले कुशीत माझ्या
येऊन तू निजली होती.

तू माझ्याशी प्रेम कर अथवा तिरस्कार,
दोन्ही माझ्याच पक्षात येईल,
जर तू माझ्याशी प्रेम करशील तर,
मी तुझ्या हृदयात असेल,
अणि जर तू माझ्याशी तिरस्कार करशील तर,
मी तुझ्या मनात असेल.

Also Read:

https://sheroshayari.net/sad-shayari-in-hindi/

Similar Posts

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *