Motivational Quotes in Marathi

Motivational Quotes in Marathi | 1200+ प्रेरणादायी विचार मराठी मध्ये

निराशा हा असा आजार आहे की एकदा कुणालाही त्याचा फटका बसला की तो बाहेर येणे खूप कठीण होते. बरेच लोक मोठ्या उत्साहात नवीन कार्य सुरू करतात. परंतु, जर आपण निश्चित केलेल्या मुदतीत यश प्राप्त झाले नाही तर काही काळानंतर सर्व उत्साह ओसरण्यास सुरवात होते. याचे सर्वात मोठे कारण म्हणजे आपल्यामध्ये मोटिवेशन ची कमतरता. आपल्याला आपल्या जीवनात मोटिवेशन ची खूप गरज असते म्हणूनच आम्ही आपल्यासोबत शेअर करत आहोत जगातील सर्वात शक्तिशाली मोटिवेशनल कोट्स Motivational Quotes in Marathi जे आपले जीवन बदलतील.

Motivational Quotes in Marathi

गरुडासारखे उंच उडायचे असेल तर,
कावळ्यांची संगत सोडावी लागेल.

तुम्ही प्रत्येक वेळेस नविन चूक
करत असाल तर नक्किच
समजा तुम्ही प्रगतीच्या मार्गावर आहात.

आयुष्यात जिंकाल तर असे जिंका,
कि जणू जिंकण्याची सवयच आहे,
आणि हराल तर असे हरा कि जिंकून
कंटाळा आल्याने गंमत म्हणून हरलो आहे.

सर्वात मोठे यश खूप वेळा
सर्वात मोठ्या निराशे नंतरच मिळत असते.

जेव्हा सगळंच संपून गेलंय
असं आपल्याला वाटतं,
तीच खरी वेळ असते,
नवीन काहीतरी सुरु होण्याची.

लक्षात ठेवा लोक उगवत्या सूर्याला
नमस्कार घालतात, मावळत्या नाही.

नेहमी लक्षात ठेवा
आपल्याला खाली खेचणारे लोक,
आपल्यापेक्षा खालच्या पायरीवर असतात.

ध्येयासाठी आतोनात प्रयत्न करा,
जगाने तुम्हाला वेडे म्हटले तरी चालेल,
कारण वेडेच लोकं इतिहास घडवतात,
आणि शिकलेली लोकं तो इतिहास वाचतात.

जिंकण्याची मजा तेव्हाच येते,
जेव्हा सर्वजण तुमच्या हरण्याची
वाट पाहत असतात.

जेव्हा एक बीज काळोख्या अंधारातून,
कठोर जमिनीतून उगवू शकते
तर तुम्ही का नाही.

रस्ता सापडत नसेल तर.
स्वत:चा रस्ता स्वत:च तयार करा.

माणसाच्या आयुष्यातील संकट ही
यशाचा आनंद घेण्यासाठी आवश्यक आहेत.

तुम्ही आयुष्यात काय कमावले याच्यावर
कधी गर्व करू नका कारण
बुद्धिबळाचा खेळ संपला कि सगळे मोहरे आणि राजा
एकाच डब्ब्यात ठेवले जातात.

काही वादळे विचलित करण्यासाठी नव्हे तर
वाट मोकळी करण्यासाठी येत असतात.

नोकर तर आयुष्यात कधीपण होऊ शकता
मालक व्हायची स्वप्न बघा.

विचार असे मांडा कि तुमच्या
विचारांवर कुणीतरी विचार केलाच पाहिजे.

विश्वास हा खोडरबर सारखा असतो
तुम्ही केलेल्या प्रत्येक चुकीबरोबर तो कमी होत जातो.

Motivational Quotes in Marathi for Success

ज्याच्याजवळ उमेद आहे,
तो कधीही हरू शकत नाही.

आजचा संघर्ष उद्याचे सामर्थ्य निर्माण करतो,
विचार बदला आयुष्य बदलेल.

वळून कोणी पाहिलं नाही म्हणून
माळावरच्या चाफ्याचं अडलं नाही
शेवटी पानांनीही साथ सोडली
पण पट्ठ्यानं बहरणं सोडलं नाही.

खेळ’ असो वा ‘आयुष्य’
आपलं सामर्थ्य तेव्हाच दाखवा जेव्हा समोरचा
आपल्याला “कमजोर” समजत असेल..

तुम्ही गरीब म्हणून जन्माला आलात
यात तुमचा काहीच दोष नाही पण जर
तुम्ही गरीब म्हणून मेलात
तर हा नक्कीच तुमचा दोष असेल.

विजेते वेगळ्या गोष्टी करत नाही
ते प्रत्येक गोष्ट वेगळेपणाने करतात.

एकदा कर्तृत्व सिद्ध झालं कि,
संशयाने बघणाऱ्या नजरा
आपोआप आदरानं झुकतात.

अपयश म्हणजे संकट नव्हे,
आपल्याला योग्य मार्गावर आणणारे
ते मार्गस्थ दगड आहेत.

हरलात तरी चालेल फक्त जिंकणारा
स्वत:हून म्हटला पाहिजे हा खेळ
आयुष्यातील सर्वात कठीण खेळ होता.

स्वतःची तुलना इतरां बरोबर करू नका,
तसे केल्यास तुम्ही स्वतःचा अपमान करत आहात.

तुम्ही कोण आहात आणि
तुम्हाला कोण व्हायचंय यातलं अंतर म्हणजे
तुम्ही काय करता.

कितीही मोठा पाठिंबा असला तरी
यशस्वी तोच होतो ज्याच्या रक्तातच
जिंकण्याची हिंमत आणि लढण्याची धमक असते.

तुम्ही ठरवलेल्या ध्येयांवर,
लोक हसत नसतील तर ,
तुमची ध्येये खूपच लहान आहेत हे लक्षात घ्या.

पैज लावायची तर स्वतः सोबतच लावा
कारण जिंकलात तर,
स्वत:चा आत्मविश्वास जिंकाल…
आणि हरलात तर स्वत:चाच अहंकार हराल.

जे लोक तुम्हाला पाठी बोलतात
त्यांच्याकडे लक्ष देऊ नका
ते तुमच्या पाठी होते आणि पाठी राहणार
आणि तुम्हाला फेमस करणार
त्यांची लायकी तिचं आहे.

शुन्यालाही देता येते किंमत,
फक्त त्याच्यापुढे एक होऊन उभे रहा.

स्वप्न मोफतच असतात,
फक्त त्यांचा पाठलाग करतांना
आयुष्यात बरीच किंमत मोजावी लागते.

Motivational Status in Marathi

रुद्राक्ष असो किंवा माणूस
खुप अवघड असत एकमुखी भेटणं.

नाही हा शब्द तुम्हाला ऐकू येत नाही,
तोपर्यंत सगळे काही शक्य आहे.

मोठ व्हायचं आणि यशस्वी व्हायचय तर
अपमान गिळायला शिका,
उद्या मोठे व्हाल तेव्हा हीच अपमान करणारी लोक
स्वतःचा मान वाढवायचा तुमची ओळख सांगतील!

छत्री पावसाला थांबवू शकत नाही
पण पावसात थांबण्याचे धाडस नक्की देऊ शकते,
तसेच आत्मविश्वास यशस्वी होण्याची खात्री
देऊ शकत नाही पण
संघर्ष करण्याची प्रेरणा नक्की देऊ शकतो.

समुद्रातलं सगळं पाणी कोणत्याही जहाजाला बुडवू शकत नाही
पण त्या जहाजानं जर ते पाणी आत येऊ दिलं
तर ते जहाज बुडल्याशिवाय रहात नाही
तसंच जगातले सगळे नकारात्मक विचार तुम्हाला हरवू शकत नाहीत
जोवर तुम्ही त्यातल्या एकालाही तुमच्या मनात प्रवेश देत नाही.

काहीच हाती लागत नाही
तेव्हा मिळतो तो अनुभव.

बोलून विचार करण्यापेक्षा
बोलण्याआधी विचार केलेला बरा.

स्वप्नं ती नव्हेत जी झोपल्यावर पडतात,
स्वप्नं ती की जी तुम्हाला झोपूच देत नाहीत.

जर एखाद्याला फसवण्यात तुम्ही यशस्वी झाला तर
तो माणूस मूर्ख आहे असं समजू नका,
त्या माणसाच्या विश्वासाला तुम्ही पात्र नव्हता
असा त्याचा अर्थ आहे.

भीती ही भावना नसून
अनेकांच्या आयुष्याला लागलेला रोग आहे.

दिवसभरात तुमच्यापुढे एकही समस्या उदभवली नाही
किंवा तुम्हाला एकही प्रश्न पडला नाही,
तर तुम्ही तुमच्या आयुष्याचा प्रवास
चुकीच्या रस्त्यावरून करत आहात.

खूप कमी लोक आपल्या आयुष्यात
सुख आणि आशीवार्द घेऊन येतात,
पण खूप जास्त लोक आपल्याला कटू
अनुभव आणि शिकवण देण्यासाठी येतात.

पुन्हा जिंकायची तयारी
तिथूनच करायची
जिथे हरण्याची जास्त भीती वाटते.

जितकी प्रसिद्धी मिळवाल
तितकेच शत्रू निर्माण कराल
कारण, तुमच्या प्रसिद्धीवर मरणारे कमी
जळणारे जास्त निर्माण होतील.

Inspirational Quotes in Marathi

यशाचा उत्तम मार्ग म्हणजे
अजुन एकदा प्रयत्न करने होय.

भरलेला खिसा माणसाला दुनिया दाखवतो,
रिकामा खिसा मात्र दुनियेतील माणसं दाखवतो.

क्रोधाच्या एका क्षणी संयम राखला तर
पश्चातापाचे शंभर क्षण वाचतात.

तलाव जेव्हा पाण्याने भरतो,
तेव्हा मासे किड्यांना खात असतात,
तलावतलं पाणी संपून कोरडा होतो,
तेव्हा किडे मास्यांना खात असतात,
संधी सगळ्यांना भेटते मित्रानो
फक्त आपली वेळ येण्याची वाट पहा.

गर्दीचा हिस्सा नाही,
गर्दीच कारण बनायचं.

चांगल्यातुन चांगले निर्माण होते
वाईटातून वाईट.

अडचणीत असतांना अडचणीपासून दूर पळणे
म्हणजे अजून मोठ्या अडचणीत जाण्यासारखेच आहे.

तुम्हाला तुमचे ध्येय गाठायचे असेल तर
तुमच्यावर भुंकणाऱ्या प्रत्येक कुत्र्यांवर
थांबून दगड मारण्यापेक्षा नेहमी बिस्कीट जवळ बाळगा
आणि पुढे चालत रहा.

वादळ जेव्हा येतात तेव्हा आपण आपल्या मातीत
घट्ट रुजून राहायचं असतं,
ती जितक्या वेगाने येतात तितक्या वेगाने निघूनही जातात,
वादळ महत्वाचं नसतं, प्रश्न आपण त्याच्याशी कशी झुंज देतो
आणि त्यातून कितपत बऱ्या अवस्थेत बाहेर येतो याचा असतो.

जेव्हा आपली नखं वाढतात तेव्हा आपण नखं कापतो बोटं नाही,
त्याच प्रमाणे जेव्हा गैरसमजातून नाती तुटायची वेळ येते
तेव्हा अहंकार तोडा नाती नाही.

पहिलं स्वप्न भंग झाल्यावरही
दुसरं स्वप्न बघण्याची हिंमत
म्हणजे जीवन.

एकमेकांविषयी बोलण्यापेक्षा
एकमेकांशी बोला
तुमचे खूप सारे गैरसमज दूर होतील.

कधी कधी काही चुकीची माणसं
आयुष्याचा खरा अर्थ समजून देतात.

आपली स्वप्ने कधीही अर्ध्यावर सोडू नका
विशेषतः ज्याच्याबद्दल दिवसातून एकदा तरी
कोणता ना कोणता विचार मनात येतोच अशी स्वप्ने.

आपला कोणी व्देष करत असेल तर त्याला
तीन पैकी एक कारण असतं
एक: त्यांना तुमची भीती वाटते
दोन: ते स्वतःचा व्देष करतात
तीन: त्यांना तुमच्यासारखं व्हायचं असतं.

Motivational Thoughts in Marathi

रस्ता भरकटला असाल तर
योग्य रस्ता निवडण्याची हीच वेळ आहे.

एकावेळी एकच काम करा,
पण असे करा की
जग त्या कामाची दखल घेईल.

क्षेत्र कोणतेही असो
प्रभाव वाढू लागला की
तुमची बदनामी होणं अटळ असतं.

कारण सांगणारी लोक यशस्वी होत नाही..
आणि यशस्वी होणारे लोक कारण सांगत नाही.

जर तुम्हाला कोणी रिजेक्ट,
अस्वीकार केल तर निराश होऊ नका,
सर्वसाधारण लोक महागड्या वस्तू रिजेक्ट करतात
त्या स्वीकारण्याची त्यांची ऐपत, लायकी नसते.

जेवढं मोठं आपले ध्येय असते,
तेवढ्याच मोठ्या अडचणी येतात.

पाण्याचा एक थेंब चिखलात पडला तर तो संपतो,
हातावर पडला तर चमकतो,
शिंपल्यात पडला तर मोती होतो ,
थेंब तोच असतो पण फरक फक्त सोबतीचा असतो.

आत्मविश्वासाचा अभाव
हेच अपयशाचे खरे कारण आहे.

एक छोटीशी मुंगी तुमच्या पायाला चावू शकते
पण तुम्ही तिच्या पायाला चावू शकत नाही,
म्हणूनच जीवनात कुणालाच छोट समजू नका
कारण ते जे करू शकते कदाचित ते तुम्ही पण
करू शकत नाही.

चुकीच्या दिशेला वेगाने जाण्यापेक्षा
योग्य दिशेला हळू हळू जाणे चांगले.

माणसाला स्वत:चा “photo”
का काढायला वेळ लागत नाही,
पण स्वत:ची “image” बनवायला काळ लागतो.

जीवनात चांगला माणूस होण्यासाठी एवढंच करा.
चुकाल तेव्हा माफी मागा,
अन कुणी चुकलं तर माफ करा.

जगा इतकं कि आयुष्य कमी पडेल,
हसा इतके कि आनंद कमी पडेल,
काही मिळाले तर नशिबाचा खेळ आहे,
पण प्रयत्न इतके करा कि
परमेश्वराला देणे भागच पडेल.

कासवाच्या गतीने का होईना
पण रोज थोडी थोडी प्रगती करा,
खूप ससे येतील आडवे,
बस त्यांना हरवायची हिम्मत ठेवा.

जी व्यक्ती तुमच्या प्रगती वर जळते
त्याचा तिरस्कार कधीच करू नका,
कारण ती व्यक्ती स्वतापेक्षा तुम्हाला
उत्कृष्ट व्यक्ती समजून जळत असते.

Inspirational Thoughts in Marathi

माणसाला दोनच गोष्टी हुशार बनवतात..
एक म्हणजे वाचलेली पुस्तकं
आणि दुसरी भेटलेली माणसं.

सगळी परिस्थती नीट समजून घेतल्याशिवाय
कुणाबद्दलही वाईट मत करून घेऊ नका
दुसऱ्याचं मत आपल्याला मान्य नाही
याचा अर्थ आपण बरोबर आहोत असा होत नाही.

न हरता, न थकता न थाबंता
प्रयत्न करण्यांसमोर कधी कधी
नशीब सुध्दा हरत.

हरला म्हणून लाजू नका
जिंकलात म्हणून माजू नका.

आयुष्यात एकदा तरी वाईट दिवसांना
सामोरे गेल्याशिवाय चांगल्या
दिवसांची किंमत कळत नाही.

कोणाच्याही सावलीखाली उभा राहिल्यावर
स्वतःची सावली कधीच निर्माण होत नाही,
स्वतःची सावली निर्माण करण्यासाठी
स्वतः उन्हात उभे रहावे लागते.

ध्येय उंच असले की ,
झेप देखील उंचच घ्यावी लागते.

आत्मविश्वासाचा अभाव
हेच अपयशाचे खरे कारण आहे.

आयुष्यात कधीही कोणासमोर
स्वतःच स्पष्टीकरण देत बसू नका
कारण ज्यांना तुम्ही आवडता,
त्यांना स्पष्टीकरणाची अजिबात गरज नसते,
अन ज्यांना तुम्ही आवडत नाही ते तुमच्या
स्पष्टीकरणावर कधीच विश्वास ठेवायला तयार होत नाही.

तुमच्या अपयशाला कवटाळून बसू नका
त्याच्या पासून शिका आणि पुन्हा सुरवात करा.

पराभवाची भीती बाळगू नका
एक मोठा विजय तुमचे सर्व
पराभव पुसून टाकू शकतो.

सर्वात मोठा रोग
काय म्हणतील लोक.

आयुष्य हा बुद्धिबळाचा खेळ आहे,
जर टिकून राहायचे असेल तर,
चाली रचत राहाव्या लागतील.

जोपर्यंत चांगले शिक्षण घेणे म्हणजे चांगली नोकरी लागणे,
हि संकल्पना पालक आणि विध्यार्थाच्या डोक्यातून निघत नाही,
तोपर्यंत समाजात नोकरच जन्माला येतील मालक नाही.

हल्ली चांगल्या कामाला
मांजरांपेक्षा माणसेच जास्त आडवी येतात.

माझ्यामागे कोण काय बोलतं,
याने मला काहीच फरक पडत नाही,
माझ्यासमोर काही बोलण्याची त्यांची
हिम्मत नाही, यातच माझा विजय आहे.

जग तुम्हाला नावे ठेवण्यात व्यस्त असते,
तुम्ही नाव कमविण्यात व्यस्त रहा.

तलवारीच्या जोरावर मिळवलेले राज्य
तलवार असेतोवरच टिकते.

आपल्या नियतीचे मालक बना
पण परिस्थितीचे गुलाम बनू नका.

Also Read:

https://sheroshayari.net/love-quotes-in-hindi/

Similar Posts

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *